कबीर (अदनान खान) आणि मिराज (गौतम विज) ने झी टीवी वरील सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये मोठी मारामारी केली.


 

कबीर ने मिराज (गौतम विज) ला शरिया बोर्ड मध्ये सदस्य बनण्यास मदत न केल्यामुळे मिराज ने कठोर शब्दांचा वापर करुन कबीर (अदनान खान) च्या प्रति आपला राग व्यक्त केला. कबीरला हे समजले आहे कि मिराज तसा नाही आहे, जसे होण्याचे तो नाटक करत आहे. 

दुस-या दिवशी, कबीर ने पाहिले कि मिराज ने जारा (ईशा सिंग) ला घेरले आहे आणि ती त्याला विरोध करत आहे, तेव्हा ताबडतोब कबीर मिराजवर धावत जाऊन जोराचापंच मारतो आणि त्याला बाल्कनीतून खाली फेकून देतो. मिराज कार वर पडतो आणि सिक्योरिटी गार्ड्स त्याला दोरीने ड्राइविंग सीट वर बांधतात. कबीर कार मध्ये बसतो आणि त्याला गाडी चालविण्यास सांगतो.

ते दोघेजण त्यांच्या प्रोजेक्ट साइट वर जातात, जेथे त्यांच्यामध्ये जोराची मारामारी होती. दोघेजण फारच जखमी होतात आणि शेवटी मिराज तेथून पळ काढतो आणि कबीर जखमी अवस्थेत घरी जातो. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA