मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा दुष्काळच

मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहे. हे जरी सत्य असले तरी मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा दुष्काळच आहे.

खरं सांगायच झालं तर सध्या प्रत्येक हफ्त्याला  मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, परंतु बॉक्स ऑफिस वर कलेक्शन फारच कमी आहे. थिएटरच भाडे देखील निघत नाही. म्हणूनच नवीन निर्माते एक चित्रपट बनविल्यानंतर गप्प बसतात.

परंतु टॉप 10 च्या यादीतील मुख्य निर्माता गप्प बसत नाही, त्याचे कारण एक आहे कि त्यांना चित्रपटांना साठी सरकारी मानधन मिळते. एवढच कायं तर चैनल पर चित्रपट विकून देखील चांगला पैसा मिळतो, परंतु ह्या निर्मात्याचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिस पर गल्ला जमविण्यात यशस्वी नाही.

एवढंच काय तर सध्याचे मराठी चित्रपट फक्त व्यापार करण्याच्या एकमेव दृष्टिकोनातून बनविला जातो. त्यामागील कला मात्र जुन्या काळा प्रमाणे मागेच पडली आहे.

जुन्या काळच्या चित्रपटांत मराठी संस्कृतिचा अभिमान वाटावा नजराणा असायचा म्हणूनच मराठी प्रेक्षक एक नाही तर दहा वेळा चित्रपट पहाण्यासाठी सिनेमा हॉल मध्ये जायचा.

पण सध्याची परिस्थिति बदलली आहे. आजच्या मॉडर्न युगात मराठी चित्रपट बनतात, परंतु कलात्मक नव्हे तर व्यावसायिक बनतात. ह्या बद्दल फारच खंत वाटते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma